सारांश :
विशेषतः आजच्या आमच्या तरुणांना विदेशांचे विलक्षण आकर्षण असल्याचे जाणवते. पण आम्ही आमचा देश पाहिलाय काय? विविधतेने नटलेला इतका सुंदर देश साऱ्या जगात दुसरा नाही. हिमशिखरांची शुभ्रधवल शाल पांघरलेला महाकाय हिमालय, फेसाळणाऱ्या लाटांनी नटलेला हजारो किलोमीटर लांबीचा रुपेरी सागरकिनारा, शेकडो पवित्र नद्या, गोडया तसेच खाऱ्या पाण्याची देखणी मोठी सरोवरे, लाव्हा रसातून उभा ठाकलेला बलदंड सह्याद्री, थरचे भले मोठे वाळवंट, कच्छचे रण, गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील सुंदरबन, विविध प्रकारची जंगले, त्यातून विहरणारे देखणे- सुंदर प्राणी-पक्षी,भारताच्या उज्जवल इतिहासाची साक्ष देणारे महाल – वाडे व किल्ले, अमर लेणी व शिल्पे, भारताची प्राचीन संस्कृती जपणारी मंदिरे! किती किती म्हणून सांगावे? हे सारे ‘याची डोळा’पहायचे आहेच. पण तोपर्यंत? माझ्या ‘सारे जहाँसे अच्छा….!’ ह्या पुस्तकातून ‘भारताची भटकंती’ करायची आहे.हे सारे मनसोक्त अनुभवायचे आहे.मग, चला तर!
Click on
button to view in fullscreen mode. To zoom the page click on
button.



Who's Online : 0