सारांश :
शिक्षण हा माझा ध्यास आहे तर विद्यार्थी (मुले) हा माझा श्वास आहे. एक उत्तम, परिपूर्ण व सहृदय माणूस घडवणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. ह्या विचारातून माझे शिक्षणविषयक लेखन घडले. आजही घडत असते.शिक्षणासंबंधीची माझी मते मी त्यातून मांडत असतो. त्यासंबंधीचे माझे विचार व्यक्त करीत असतो.पाठ्यपुस्तकातून प्रारंभी छापलेल्या ‘प्रतिज्ञे’ पासून ‘परीक्षार्थी’ दृष्टीकोनापर्यंत आणि ‘शालेय ग्रंथालया’पासून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘शिक्षां’पर्यंत अनेकविध विषयांवर मी माझी मते व विचार अत्यंत तळमळीने व परखडपणे मांडले आहेत. मात्र, माझा विचारच तेवढा खरा व परिपूर्ण असे कधीही मी मानले नाही. टीकेसाठी टीका मी कधीही केली नाही.हे नको असे मी जरूर लिहितो. पण त्याचवेळी त्याऐवजी नेमके काय हवे ते मी आवर्जून मांडतो.’शिक्षण:मते आणि विचार’ मध्ये वाचकांना ह्याचा प्रत्यय येईल.
Click on
button to view in fullscreen mode. To zoom the page click on
button.



Who's Online : 0